Lavc57.107.100
हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान
हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे.
कोणत्या आजारांचा असतो धोका
थंडीच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सीजनल फ्लू, सर्दी, खोकला, घशात खवखव, वायरल ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय पोट, लिव्हर, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टमसोबत कफ आणि घशातही समस्या होते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच अपचन आणि डायरियाची देखील समस्या होऊ शकते.
कशी घ्याल काळजी
थंडीच्या दिवसात बाहेर काही खाण्याऐवजी आवडीनुसार घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता. घरीच तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी सूजचं सेवन करू शकता. घरीच बनवलेले गरमागरम आणि ताजी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या दिवसात जास्तीत जास्त लोक घरातच जास्त वेळ राहत असल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…