आरोग्य

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. परंतु, चालताना काही चुका झाल्या तर फायद्याऐवजी आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.

चुकीच्या पद्धतीने चालल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे चालताना या ८ चुका करणे टाळायला हवे. 

1) खूप वेगाने किंवा हळू चालणे

अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण खूप वेगाने चालतो किंवा अधिकतर वेळी आपण हळू चालतो. ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. अचानक वेगाने चालल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. चालण्यासाठी वेग ही योग्य असायला हवा. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

2) वॉर्म-अप आणि कूल-डाऊन न करणे

अचानक वॉर्म अप न करता जलद चालणे सुरु केल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. अचानक चालताना थांबल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे चालण्यापूर्वी आणि नंतर ५ ते १० मिनिटांनी स्ट्रेचिंग किंवा हळू चालावे.

3) चुकीच्या पद्धतीने चालणे

वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्याने श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यासाठी सरळ उभे राहून खांदे सैल ठेवून आणि हात हलवून चालत जा.

4) योग्य प्रमाणात पाणी न पिणे

डिहायड्रेशनमुळे रक्ताचा थर जाड होतो. ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते. उन्हाळ्यात वॉर्किंगला जाण्यापूर्वी किंवा नंतर पाणी प्या.

5) जड नाश्ता केल्यानंतर 

चालायला जाण्यापूर्वी जड किंवा तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. चालायला जाण्यापूर्वी हलका नाश्ता करा. फळे किंवा सुका मेवा सारखे पदार्थ खा.

6) प्रदूषण

धुळीने भरलेल्या किंवा जास्त प्रमाणात रहदारी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रदूषणांमुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. चालायला जाण्यासाठी गार्डनर किंवा हिरवागार ठिकाण शोधा.

7) अधिक श्रम करणे

जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीत दुखत असेल तर अशावेळी लगेच थांबा. जास्त चालण्यामुळे हृदयासाठी धोकादायक ठरु शकते. उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्यांनी काळजी घ्यावी.

8) नियमितता न राखणे 

अधूनमधून लांब चालत जाण्याऐवजी दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चाला. अनियमित चालण्यामुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

3 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

3 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

21 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

21 तास ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

21 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

21 तास ago