आरोग्य

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. परंतु, चालताना काही चुका झाल्या तर फायद्याऐवजी आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.

चुकीच्या पद्धतीने चालल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे चालताना या ८ चुका करणे टाळायला हवे. 

1) खूप वेगाने किंवा हळू चालणे

अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण खूप वेगाने चालतो किंवा अधिकतर वेळी आपण हळू चालतो. ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. अचानक वेगाने चालल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. चालण्यासाठी वेग ही योग्य असायला हवा. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

2) वॉर्म-अप आणि कूल-डाऊन न करणे

अचानक वॉर्म अप न करता जलद चालणे सुरु केल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. अचानक चालताना थांबल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे चालण्यापूर्वी आणि नंतर ५ ते १० मिनिटांनी स्ट्रेचिंग किंवा हळू चालावे.

3) चुकीच्या पद्धतीने चालणे

वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्याने श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यासाठी सरळ उभे राहून खांदे सैल ठेवून आणि हात हलवून चालत जा.

4) योग्य प्रमाणात पाणी न पिणे

डिहायड्रेशनमुळे रक्ताचा थर जाड होतो. ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते. उन्हाळ्यात वॉर्किंगला जाण्यापूर्वी किंवा नंतर पाणी प्या.

5) जड नाश्ता केल्यानंतर 

चालायला जाण्यापूर्वी जड किंवा तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. चालायला जाण्यापूर्वी हलका नाश्ता करा. फळे किंवा सुका मेवा सारखे पदार्थ खा.

6) प्रदूषण

धुळीने भरलेल्या किंवा जास्त प्रमाणात रहदारी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रदूषणांमुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. चालायला जाण्यासाठी गार्डनर किंवा हिरवागार ठिकाण शोधा.

7) अधिक श्रम करणे

जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीत दुखत असेल तर अशावेळी लगेच थांबा. जास्त चालण्यामुळे हृदयासाठी धोकादायक ठरु शकते. उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्यांनी काळजी घ्यावी.

8) नियमितता न राखणे 

अधूनमधून लांब चालत जाण्याऐवजी दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चाला. अनियमित चालण्यामुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

2 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

2 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

2 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

2 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

6 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

6 तास ago