हिवाळ्यात आपली पचनशक्ती सुधारलेली असते, त्यामुळे या ऋतूत खाल्लेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खालील आहार अत्यंत फायदेशीर ठरतो.
उष्णता देणारे पदार्थ
तीळ आणि गूळ: तीळ उष्ण असतात आणि गुळात लोह भरपूर असते. मकर संक्रांतीच्या काळात म्हणूनच तीळ-गुळाचे पदार्थ खाल्ले जातात.
बाजरी: बाजरीची भाकरी शरीराला ऊब देते. बाजरीत तंतूमय पदार्थ आणि खनिजे भरपूर असतात.
पालेभाज्या: पालक, मेथी, शेपू आणि मोहरीचा साग यांसारख्या भाज्यांची या दिवसांत रेलचेल असते. यात लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात.
कंदमुळे: गाजर, बीट, रताळी यांचा आहारात समावेश करावा. गाजराचा हलवा किंवा कांजिजी आरोग्यासाठी उत्तम असते.
डिंकाचे लाडू: साजूक तूप, डिंक, सुके खोबरे आणि सुका मेवा वापरून बनवलेले लाडू हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात.
खारीक आणि बदाम: रात्री भिजवलेले बदाम किंवा खारकेची पूड दुधात टाकून घेतल्यास शक्ती वाढते.
व्हिटॅमिन-C युक्त फळे: संत्री, मोसंबी, आवळा आणि पेरू यांसारखी फळे खावीत. यामुळे सर्दी खोकल्या पासून बचाव होतो.
सीताफळ आणि बोर: ही या ऋतूतील खास फळे आहेत. त्याचा वापर अवश्य करावा.
हळदीचे दूध: रात्री झोपताना गरम दुधात हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आलं आणि लसूण: जेवणात आलं, लसूण आणि मिरीचा वापर वाढवावा. यामुळे शरीरातील कफ कमी होण्यास मदत होते.
काही महत्त्वाच्या टिप्स
पुरेसे पाणी प्यावे: थंडीत तहान कमी लागते, पण शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोमट पाणी पित राहावे.
ताजे आणि गरम अन्न: नेहमी ताजे आणि गरम पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे.
अति तेलकट टाळावे: जरी भूक लागत असली, तरी अति तेलकट किंवा जंक फूड खाणे टाळावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…