शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण जे काही खातो किंवा पितो ते रक्तात मिक्स होतं. अशात जेव्हा आपण जे काही अनहेल्दी खातो त्याचेही कण रक्तात मिक्स होतात. ते साफ करण्याचं किंवा बाहेर काढण्याचं काम किडनी आणि लिव्हर करत असतं.
मात्र, अनेकदा रक्तात इतके जास्त विषारी तत्व असतात की, लिव्हर किंवा किडनीही ते बाहेर काढू शकत नाही. ते रक्तात वाढू लागतात आणि शरीराला आतून नुकसान पोहोचवत असतात. अशात हे विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी किडनी आणि लिव्हरवर जास्त दबाव पडत असल्यानं हे अवयवही डॅमेज होण्याचा धोका असतो.
रक्तात टॉक्सिन वाढण्याची कारण
डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, प्रदूषण किंवा अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे रक्तात टॉक्सिन जमा होतात. हे विषारी तत्व लिव्हर आणि किडनीवर दबाव टाकतात. ज्यामुळे शरीरात आळस आणि कमजोरी जाणवते.
नॅचरल ब्लड क्लीनर कडूलिंब
कडूलिंबाची पानं हे नॅचरल डिटॉक्सिफायर असतात. कडूलिंबाची पानं किंवा त्याचं रक्त शुद्ध करण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे. कडूलिंबात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यानं रक्त शुद्ध होण्यासोबतच त्वचेवर ग्लो येतो आणि इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. कडूलिंबाच्या पानांची पेस्टही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
कसा कराल वापर
रोज सकाळी उपाशीपोटी ३ ते ४ कडूलिंबाची पाने चावून खावीत. त्याशिवाय ५ ते ७ पानं पाण्यात उकडून घ्या. हलकं कोमट पाणी गाळून पिऊ शकता. कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही याप्रमाणे रक्त शुद्ध करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…