उन्हाळा आला की घाम येणे हे ठरलेले समीकरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे ही बहुतेकांची मोठी समस्या ठरते. घामापासून वाचण्यासाठी आजकाल एसी, फॅन यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. घर, गाडी, ऑफिस सर्वत्र वातानुकूलनाची सोय असली तरी घाम येणे पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र, घाम येणे हे आरोग्यासाठी घातक नसून उलट ते चांगल्या आरोग्याचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
घाम येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. घामाच्या माध्यमातून शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. घाम येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नसून, शरीर सुरळीतपणे कार्य करत असल्याचे संकेत मानले जाते. मात्र, प्रमाणाबाहेर घाम येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
घाम येण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. विशेषतः उन्हाळ्यात सतत बदलणाऱ्या तापमानामुळे शरीरावर ताण येतो. अशा वेळी घामामुळे शरीर थंड राहते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच घामामधील अँटी-मायक्रोबियल घटकांमुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
वजन कमी करण्यासाठीही घाम येणे उपयुक्त ठरते. व्यायाम करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे जिम किंवा व्यायामादरम्यान येणारा घाम हा शरीरासाठी फायदेशीर मानला जातो.
नियमित घामामुळे शरीराची डिटॉक्स प्रक्रिया सुलभ होते. घामाच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये, मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसते.
एकंदरीत, घाम येणे ही शरीराची संरक्षणात्मक आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घाम येणे टाळण्याऐवजी त्याचे फायदे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, अती प्रमाणात घाम येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…