आरोग्य

उन्हाळ्यात घाम येणे त्रासदायक की आरोग्यदायी? जाणून घ्या घाम येण्याचे आश्चर्यकारक फायदे

उन्हाळा आला की घाम येणे हे ठरलेले समीकरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे ही बहुतेकांची मोठी समस्या ठरते. घामापासून वाचण्यासाठी आजकाल एसी, फॅन यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. घर, गाडी, ऑफिस सर्वत्र वातानुकूलनाची सोय असली तरी घाम येणे पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र, घाम येणे हे आरोग्यासाठी घातक नसून उलट ते चांगल्या आरोग्याचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

घाम येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. घामाच्या माध्यमातून शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. घाम येणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नसून, शरीर सुरळीतपणे कार्य करत असल्याचे संकेत मानले जाते. मात्र, प्रमाणाबाहेर घाम येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

घाम येण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. विशेषतः उन्हाळ्यात सतत बदलणाऱ्या तापमानामुळे शरीरावर ताण येतो. अशा वेळी घामामुळे शरीर थंड राहते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच घामामधील अँटी-मायक्रोबियल घटकांमुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

वजन कमी करण्यासाठीही घाम येणे उपयुक्त ठरते. व्यायाम करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे जिम किंवा व्यायामादरम्यान येणारा घाम हा शरीरासाठी फायदेशीर मानला जातो.

नियमित घामामुळे शरीराची डिटॉक्स प्रक्रिया सुलभ होते. घामाच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये, मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसते.

एकंदरीत, घाम येणे ही शरीराची संरक्षणात्मक आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घाम येणे टाळण्याऐवजी त्याचे फायदे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, अती प्रमाणात घाम येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

46 मिनिटे ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

1 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

1 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

3 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

3 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

3 तास ago