किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची सवय ही देखील याचे एक मुख्य कारण आहे. किडनी स्टोन झाल्यास आहाराची योग्य काळजी घेतल्यास बऱ्याच अंशी ही समस्या सुटू शकते. मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यावी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा? कोणते पदार्थ टाळायला हवेयत? जाणून घेऊया.
सीफूड आणि मांस: सी फूड आणि मांस खाण्याची आवड असेल, ते वेळीच सोडले पाहिजे. यासोबतच प्रथिनयुक्त पदार्थ देखील टाळावे. या पदार्था मध्ये प्युरीन नावाचे घटक आढळतात. स्टोनच्या रुग्णाच्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढले तर शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.
पालक: पालक भाजीचे सेवन टाळावे. या भाजीत ऑक्सलेट आढळते. पालक खाल्ल्याने ते कॅल्शियम गोळा करते आणि ते लघवी पर्यंत पोहोचू देत नाही. ज्यामुळे प्रकृती बिघडू शकते.
टोमॅटो: टोमॅटो मध्ये ऑक्सलेटचे प्रमाण भरपूर असते. किडनी स्टोन असलेल्या टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. जर टॉमेटो खात असाल तरी त्याच्या बिया नक्कीच काढा.
चॉकलेट: चॉकलेट खाणे टाळावे. कारण यामध्ये ऑक्सलेट्स असल्यामुळे स्टोनची समस्या वाढू शकते.
चहा: स्टोनचा त्रासात चहा पिणे टाळावे. चहामुळे स्टोनचा आकार वाढतो.
घ्यायची काळजी
किडनी स्टोनचे रुग्ण असाल तर पचायला जास्त वेळ जाईल अशा पदार्थांचे आहारात सेवन करू नये. मांस, मासे, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे पदार्थ टाळावे. फळांमध्ये, स्ट्रॉबेरी, प्लम्स तसेच अंजीर आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांचे सेवन करू नये. दही, चीज, लोणी अशा दूध नि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे. कॅन केलेला सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड इत्यादी टाळावे. वांगी, मशरूम, फ्लॉवर सारख्या भाज्या टाळाव्यात, यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…
मुंबई : वरळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची…