शरीराला ताकद पुरविणारे ‘पावर हाउस’ कोणते असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पोटॅशियम असेच असेल. पोटॅशियम शरीरातील कोशिका मध्ये असून, हे नर्व्हज आणि स्नायूंना क्रियाशील ठेवण्यास मदत करते. तसेच इतर पौष्टिक तत्वे अवशोषित होण्यासाठी, किडनीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि सोडियमची पातळी नियंत्रित ठेवण्यासही पोटॅशियम सहायक आहे.
आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करून आपण पोटॅशियम प्राप्त करू शकतो. पण वास्तविक बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन शारीरिक गरजेच्या अर्ध्या मात्रे मध्येच पोटॅशियम मिळत असते. जर शरीराला पोटॅशियम कमी मात्रे मध्ये मिळत असले, तर त्यामुळे बद्धकोष्ठ, स्नायू मध्ये अशक्तपणा, शारीरिक थकवा अशी लक्षणे जाणवू लागतात.
जसजशी पोटॅशियमची कमतरता वाढू लागेल, तसतशी ही लक्षणे देखील जास्त जाणवू लागतात. जर ही लक्षणे प्रमाणा बाहेर वाढली, तर त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. ज्या व्यक्ती लॅक्झेटीव्हज किंवा डाययुरेटिक औषधांचा अतिवापर करतात, त्यांच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता होऊ शकते. तसेच ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नसेल, किंवा ज्यांना वारंवार डायरियाचा त्रास होत असेल, त्यांच्याही शरीरा मध्ये ही कमतरता उद्भवते. त्याच बरोबर अतिशय उष्ण हवामानात सतत शारीरिक श्रम केल्यानेही ही कमतरता उद्भवते.
पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयाचे ठोके अनियमित असणे, रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढणे, किडनी स्टोन्सचा त्रास उद्भवणे, सतत शारीरिक थकवा जाणवणे, कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करीत असताना स्नायू मध्ये ‘क्रॅम्पस्’ येणे, ही सर्व लक्षणे देखील पोटॅशियमच्या कमतरतेची सूचक असू शकतात. ही कमतरता आहारात ताज्या भाज्या, फळांचा समावेश करून दूर करता येतेच, पण गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस् घेऊन पोटॅशियमची कमतरता दूर करता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…