जेवण झाल्यावर काही वेळातच पोटात सतत गुडगुड आवाज येतो? कधी गॅस, कधी अपचन, कधी फुगलेलं पोट आणि मग दिवसाची वाट लागते. हे दिसायला सामान्य वाटलं तरी यामागे पचनतंत्र बिघडलेलं असतं.
उपाय आहे अगदी घरगुती आणि तो म्हणजे सुकं खोबरं. महागड्या गोळ्या, सिरप्स किंवा औषधं नकोत. फक्त रोजच्या जेवणानंतर १ चमचा सुकं खोबरं चावून खा. खोबरं हे अत्यंत गुणकारी मानलं जातं, ते पचनक्रिया सुधारतं, आतड्यांतील उष्णता कमी करतं आणि पोट शांत ठेवतं. सुकं खोबरं हे नैसर्गिक पध्दतीनं पचन सुधारतं. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे गॅस तयार होत नाही. त्यामुळे जेवणानंतर होणारी पोटातली अस्वस्थता कमी होते, आणि त्याचा चवही छान लागतो.
रोजच्या जेवणात ही छोटी सवय लावा; १ चमचा सुकं खोबरं आणि पचन राहील तंदुरुस्त. त्यासाठी कोणतेही औषध लागणार नाही. फक्त या एका सवयीने ही समस्या मिटेल. शेवटी लक्षात ठेवा; पोट शांत, तर मन शांत. त्यामुळे पोटाशी मैत्री करा आणि सुकं खोबरं ही नैसर्गिक भेट रोजच्या आहारात सामावून घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…