तान्ह्या बाळाची हिवाळ्यात कशी काळजी घ्याल? बाळाच्या नाजूक त्वचेसाठी… बाळाच्या त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श सगळ्यांनाच अगदी हवाहवासा वाटत असतो. पण त्या नाजुकशा त्वचेला मात्र खूप काळजीपुर्वक हाताळण्याची गरज असते. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान बाळांची त्वचा ही कितीतरी पटीने जास्त नाजूक असते. म्हणूनच बाळाच्या त्वचेची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यातही आता सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. या दिवसांतल्या थंड, कोरड्या हवेमुळे त्वचा खूपच कोरडी, रुक्ष होते. त्वचेवरून पांढरट भुरकट थर जमा होतो. बऱ्याचदा त्यामुळे त्वचेला खाज सुद्धा येते. त्यामुळे या ऋतूमध्ये आपल्या बाळाच्या त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी हे पहिल्यांदाच आई- बाबा होण्याचा अनुभव घेणाऱ्या काही पालकांना कदाचित माहितीही नसते.
हिवाळ्यात बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात बाळाला आंघोळ घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या गारव्यात बाळाला नेहमीपेक्षा थोडी पटकन म्हणजेच ५ ते १० मिनिटांत आंघोळ घालावी. थंडीमध्ये बाळाला एक दिवसाआड आंघोळ घातली तरी चालेल. बाळाच्या आंघोळीसाठी तुम्ही जो साबण वापरणार आहात तो देखील अतिशय सौम्य हवा. कारण खूप हार्ड साबण या दिवसांत बाळाच्या नाजूक त्वचेला सहन होत नाही आणि त्वचा कदाचित कोरडीही होऊ शकते.
जॉन्सन्स बेबी क्रीम
हिवाळ्यात बाळाची त्वचा कोरडी पडू नये, म्हणून बाळाची आंघोळ झाल्यानंतर त्याचे अंग पुसून घ्या आणि त्वचेला मॉईश्चराईज करा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा मऊ, मुलायम होते.आंघोळीसाठी खूप कडक पाणी वापरू नका. कारण कडक पाण्यामुळे त्वचेतले नैसर्गिक माॅईश्चर कमी होऊन ती लवकर कोरडी पडू शकते.
बाळासाठी जॉन्सन्स बेबी क्रीम महत्त्वाचे का
आंघोळ घालून अंग पुसल्यानंतर बाळाला जॉन्सन्स बेबी क्रीम अवश्य लावावे. कारण ते बाळाच्या त्वचेच्या दृष्टीने योग्य ठरणाऱ्या अनेक सौम्य घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. जॉन्सन्स बेबी क्रीममध्ये असणारा कॅमोमाइल हा घटक ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असणारा आहे. त्यामुळे त्वचेवर खाज येत नाही. त्वचा मुलायम राहते. शिवाय त्यात असणाऱ्या ग्लिसरीनमुळे त्वचेला खूप छान मॉईश्चराईज केले जाते. त्यामुळे हिवाळ्यातल्या थंड, कोरड्या हवेचा परिणाम त्वचेवर होत नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…