शिरूर तालुका

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम बाळासाहेब थोरात (वय २८) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अपघाताच्या दिवशी वडील बाळासाहेब थोरात हे एम एच १२ एन एन ३६०२ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन करडे गावातील चौकातुन न्हावरे रोडने घरी येत असताना समोरुन आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला.

या अपघातात बाळासाहेब थोरात यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. धडक दिलेल्या अज्ञात वाहनचालकाने मदत न करता घटनास्थळावरुन वाहन घेऊन पळ काढल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.करडे येथील स्थानिक नागरिकांनी अपघाताबाबत कोणतीही माहिती असल्यास शिरुर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago