थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो.
शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी महिला अशा वेळी जास्त जवळच्या वाटतात. मग आई एक जादूची पोटली तयार करून देते. जिच्यामुळे लहान मुलांचा कफ सुटतो. सर्दी बरी होते आणि खोकला पण जातो. वर्षानुवर्षे चालत आलेला हा उपाय म्हणजे ओव्याची पुरचुंडी. बळांसाठी हा उपाय नेहमीच उपयुक्त ठरला आहे. आपल्या आईने, आजीने आपल्यासाठी ही ओव्याची पुरचुंडी वापरली असेलच. ‘जुनं ते सोनं’ असा हा उपाय आहे.
“घरगुती उपाय नको.” असं आजकाल बऱ्याच जणी म्हणतात. त्यांनी हे लक्षात घ्या की, डॉक्टरही हा उपाय सुचवतातच. करायला सोपा आणि दुष्परिणाम काहीच नाहीत. “ओव्यामध्ये अँटी- बॅक्टेरियल सत्व असतात.” त्यामुळे ओव्याच्या वासाने साकळलेला कफ विरघळून बाहेर पडतो. कंजेक्शन कमी कमी होत जाऊन नाहीसे होते. छातीचा पिंजरा साफ होतो. पोटासाठीही ओवा चांगला. बाळांना ओवा खायला देऊ शकत नाही. तो तिखट लागतो. अडकू शकतो. त्यामुळे ओव्याची पुरचुंडी वापरायची पद्धत आहे.
पुरचुंडी कशी तयार कराल
1) तव्यावर किंवा पॅनमध्ये अर्धी वाटी ओवा घ्या. त्याचा वास सुटेपर्यंत तो परतून घ्या. सुती कापडामध्ये तो बांधून त्याच्या पुरचुंड्या तयार करून घ्या. तीन चार पुड्या तरी तयार करा. जास्त फायदेशीर ठरेल.
2) पूरचूंडी सुटणार नाही याची काळजी घ्या. नीट घट्ट बांधा.
3) बाळाच्या आजूबाजूला त्या पुड्या व्यवस्थित पसरवून ठेवा.
4) ओव्याच्या वासाने बाळाचे नाक वाहायचे थांबते. हा उपाय नक्की करून पाहा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…