महाराष्ट्र

बटाट्याचा पाला खाल्यानंतर गाई व्यवसायिकांच्या २० गाई मृत्युमुखी…

निरगुडसर (मंचर) : बटाट्याचा पाला खाल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या १६ मोठ्या गाई ४ कालवडी अशा एकूण २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे.

राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या एकूण ३० ते ४० गायांना विषबाधा झाली आहे. काही गायांची प्रकृती चिंतानजक असल्यामुळे आणखी काही गाई दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्री करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.

दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायांना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायांना विषबाधा झाली व २० लहान मोठी जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. तर ३० ते ४० गायांची प्रकृती गंभीर आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गायांवर औषध उपचार सुरु आहेत. एकूण २० जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरुर तालुक्यात जनावरांना होऊ लागला लंपी आजाराचा शिरकाव

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

निडर गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

7 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

7 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

21 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

21 तास ago