मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर लिहिले आहे.
“दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार!”
फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमध्ये हिंदू आतंकवाद या संकल्पनेवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते. मालेगाव स्फोटप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर अनेक राजकीय आणि सामाजिक स्तरांवरून प्रतिक्रिया येत आहेत. फडणवीस यांच्या या वक्तव्याने या चर्चेला आणखी एक राजकीय दिशा मिळण्याची शक्यता आहे.
१७ वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल: सर्व आरोपी निर्दोष
दरम्यान, २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील भीक्खू चौकात रमजानच्या काळात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर आज निकाल लागला. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या विशेष न्यायालयाने या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मालेगाव शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात उध्वस्त झाले होते.
न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे नमूद केले की, “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही.” त्यामुळे पुराव्यांच्या अभावामुळे आणि संशयाचे सावट पुरेसे न ठरल्याने सर्व सात आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले. या खटल्यात माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह अन्य पाच आरोपी होते. या सर्वांवर यापूर्वी विविध गंभीर आरोप ठेवले गेले होते, ज्यात कटकारस्थान, दहशतवादी कृत्ये, आणि गैर कायदेशीर स्फोटके वापरण्याचा समावेश होता. मात्र पुरावे आणि साक्षी-पुरावे न्यायालयात टिकले नाहीत.
या निकालामुळे एकीकडे आरोपी आणि त्यांचे समर्थक दिलासा व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे या स्फोटात आपल्या प्रियजनांना गमावलेली कुटुंबे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्यासाठी हा निकाल एक अस्वस्थ करणारा शेवट आहे. या प्रकरणाच्या निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वासाच्या चर्चेला नवी दिशा दिली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…