महाराष्ट्र

त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी त्यांना कधीच मनापासून माफ करणार नाही,” असं मोदींनी जाहीरपणे सांगितले होते. परिणामी साध्वी प्रज्ञासिंह यांना २०२४ मध्ये खासदारकीचे तिकिट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या राजकारणीतील करियरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली होती.

साध्वींचा विजय

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह निवडणूक रिंगणात होते. परंतु साध्वी यांनी ३ लाख ६४ हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी निवडणुकीत त्यांचा एकूण खर्च फक्त ४५ लाख रुपये दाखवला होता. हा खर्च लोकवर्गीतून आणि काही संस्थांनी केल्याच सांगण्यात आले होते.

साध्वींचे वादग्रस्त विधान

मे २०१९ मध्ये, साध्वी प्रज्ञा देवास लोकसभेचे उमेदवार महेंद्र सिंह सोलंकी यांच्या प्रचारासाठी आगर येथे गेल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे याला खरा देशभक्त म्हटले. व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणुकीच्या हंगामात भूकंप झाला. भाजपने लगेचच या विधानापासून स्वतःला दूर केले. पक्षातील सर्व नेत्यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाला वैयक्तिक म्हणण्यास सुरुवात केली. देशात निवडणुकांचे काही टप्पे शिल्लक होते. पक्षाच्या दबावाखाली साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली.

पंतप्रधान मोदींचा रोष

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही शेवटची रॅली होती. रॅलीच्या शेवटच्या दिवशी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की गांधीजी किंवा गोडसे यांच्याबद्दल बोललेल्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या द्वेषाला पात्र आहे. सुसंस्कृत समाजात अशी भाषा चालत नाही. ही विचारसरणी काम करू शकत नाही. त्यांनी माफी मागितली आहे पण मी त्यांना मनापासून कधीच माफ करू शकणार नाही.

राजकारणातील करियरला ब्रेक

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या निवडून आल्या पण या विधानामुळे त्यांच्या राजकीय करियरला ब्रेक लागल्याचे सांगितले जाते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आले आहे. त्यांचे तिकीट कापून माजी महापौर आलोक शर्मा यांना देण्यात आले. यावर साध्वी माध्यमांशी बोलताना त्यांचे दुःख स्पष्ट दिसून आले. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची काही विधाने आवडली नाहीत, परंतु त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

5 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

5 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

6 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

6 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

6 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

6 तास ago