महाराष्ट्र

त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी त्यांना कधीच मनापासून माफ करणार नाही,” असं मोदींनी जाहीरपणे सांगितले होते. परिणामी साध्वी प्रज्ञासिंह यांना २०२४ मध्ये खासदारकीचे तिकिट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या राजकारणीतील करियरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली होती.

साध्वींचा विजय

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह निवडणूक रिंगणात होते. परंतु साध्वी यांनी ३ लाख ६४ हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी निवडणुकीत त्यांचा एकूण खर्च फक्त ४५ लाख रुपये दाखवला होता. हा खर्च लोकवर्गीतून आणि काही संस्थांनी केल्याच सांगण्यात आले होते.

साध्वींचे वादग्रस्त विधान

मे २०१९ मध्ये, साध्वी प्रज्ञा देवास लोकसभेचे उमेदवार महेंद्र सिंह सोलंकी यांच्या प्रचारासाठी आगर येथे गेल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे याला खरा देशभक्त म्हटले. व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणुकीच्या हंगामात भूकंप झाला. भाजपने लगेचच या विधानापासून स्वतःला दूर केले. पक्षातील सर्व नेत्यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाला वैयक्तिक म्हणण्यास सुरुवात केली. देशात निवडणुकांचे काही टप्पे शिल्लक होते. पक्षाच्या दबावाखाली साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली.

पंतप्रधान मोदींचा रोष

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही शेवटची रॅली होती. रॅलीच्या शेवटच्या दिवशी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की गांधीजी किंवा गोडसे यांच्याबद्दल बोललेल्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या द्वेषाला पात्र आहे. सुसंस्कृत समाजात अशी भाषा चालत नाही. ही विचारसरणी काम करू शकत नाही. त्यांनी माफी मागितली आहे पण मी त्यांना मनापासून कधीच माफ करू शकणार नाही.

राजकारणातील करियरला ब्रेक

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या निवडून आल्या पण या विधानामुळे त्यांच्या राजकीय करियरला ब्रेक लागल्याचे सांगितले जाते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आले आहे. त्यांचे तिकीट कापून माजी महापौर आलोक शर्मा यांना देण्यात आले. यावर साध्वी माध्यमांशी बोलताना त्यांचे दुःख स्पष्ट दिसून आले. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची काही विधाने आवडली नाहीत, परंतु त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago