महाराष्ट्र

बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक व प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, “राज्य विद्युत महामंडळाच्या महावितरण, महापारेषण व इतर विभागांमध्ये शेकडो जागा रिक्त आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही पदे भरली जात नाहीत. रोजगार सत्याग्रह यात्रेतून आम्ही सरकारला कठोर इशारा देत आहोत, भरती प्रक्रिया सुरू करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर तसेच विधानसभेतही याविरोधात आवाज उठवेल. तरुणांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९:०० वाजता क्रांती चौक येथून या यात्रेला प्रारंभ होऊन MSEB चे सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय, मिल कॉर्नर येथे पोहोचेल. तेथे निवेदन सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करणार आहे.

 

सरकारने १) महावितरण, महामार्ग व महानगरपालिका विभागांतील ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षणावर आधारित सर्व रिक्त पदांची तातडीने भरती करावी.

२) विभागातील सर्व रिक्त पदे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन भरावीत.

३) महावितरण व महामार्ग विभागांतील कंत्राटी सेवेची मुदत ३ वर्षांवरून १ वर्षावर आणावी.

४) दरवर्षी होणारी पदविका परीक्षा नियमित भरती प्रक्रियेत समाविष्ट करावी.

५) कोणत्याही कारणास्तव नोकरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” नियुक्तीची संधी द्यावी.

६) सहाय्यक अभियंता पदासाठीची GATE परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करावी.

७) कनिष्ठ अभियंता पदासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवावी. या मागण्यांसाठी हा सत्याग्रह आहे. या रोजगार यात्रेत मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व अन्य संलग्न विभागाचे कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

5 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

6 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

7 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

8 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

9 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

9 तास ago