नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गंभीर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशा शब्दांत दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून राज्याच्या वैचारिक परंपरेलाच आव्हान देणारी आहे.
तसेच, दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देणारी भाषा वापरणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास लक्षात घेता, प्रकाश आंबी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतरही शासनाने मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करत, गृहखात्याने तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…