नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गंभीर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशा शब्दांत दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून राज्याच्या वैचारिक परंपरेलाच आव्हान देणारी आहे.
तसेच, दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देणारी भाषा वापरणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास लक्षात घेता, प्रकाश आंबी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतरही शासनाने मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करत, गृहखात्याने तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…