नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गंभीर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशा शब्दांत दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून राज्याच्या वैचारिक परंपरेलाच आव्हान देणारी आहे.
तसेच, दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देणारी भाषा वापरणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास लक्षात घेता, प्रकाश आंबी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतरही शासनाने मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करत, गृहखात्याने तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…