मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.
मेरठच्या लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल हॉस्पिटल अँड कॉलेज या रुग्णालयात ३० वर्षीय सुनील कुमार यांना अपघातानंतर उपचारांसाठी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर झोपले होते. तासभरात सुनील यांना वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. रक्तस्त्राव होऊन सुनील कुमार यांचा आपत्कालीन वॉर्डमध्ये मृत्यू झाला.
ड्युटीवर असलेल्या मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर रेसिडेंट डॉक्टरचा एसीसमोर झोपलेला कथित व्हिडीओ समोर आला. त्यानंतर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सदर व्हिडीओची दखल घेतली आहे आणि संबंधिज ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर भूपेश कुमार राय यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आयसी गुप्ता यांनी दिली आहे. शोकाकुल कुटुंबाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
रविवारी (२८ जुलै) रात्री एका वाहनाने ३० वर्षीय सुनील कुमार यांच्या दुचाकीला कारने धडक मारली होती. सुनील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर झोपले होते. त्यांना जागे होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली. इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली. रक्तस्त्राव होत असल्याने सुनील यांचा स्ट्रेचरवरच मृत्यू झाला, असे सुनील कुमार यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…