औरंगाबाद: National Highways Authority of India (NHAI) द्वारे 225 किमी पुणे-अहमदनगर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर प्रदेशांमधून मार्ग संरेखित असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. याला संभाजीनगर -पुणे द्रुतगती मार्ग असेही म्हणतात.
या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वादोन तासांत पार होईल, असा मार्ग नव्याने बांधण्याची घोषणा एप्रिल २०२२ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.त्यासाठी भूसंपादनाची अधिसूचना ३ (ए) निघाली असून, औरंगाबाद तालुक्यातील ७, तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून या महामार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या महामार्गासाठी तीन जिल्ह्यांत यासाठी भूसंपादन करावे लागणार असून, पहिल्या टप्प्यातील पुण्याकडून भूसंपादन होणार आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार असून, या जिल्ह्यांतील भूसंपादनाची जबाबदारी कॉम्पिटेंट ॲथॉरिटी फॉर लॅण्ड ॲक्वायजेशन उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल.
ह्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…
औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रक, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातील भूसंपादन करावे लागणार आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : करडे (ता. शिरुर) गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाचा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…