kalgitura
मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ९/८/२०२४ रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामना या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे केले आहे.
कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, पारनेर, हवेली, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोते वर्ग उपस्थित राहतो. या भागातील कलगीतुऱ्याचा सर्वात मोठा महोत्सव असतो. साधारण दहा ते पंधरा हजार व श्रोत्यांचा समुदाय हजर असतो. सदर कार्यक्रमाला लोक उस्फूर्तपणे देणगी देतात. कोरोना काळातील दोन वर्षाचा खंड वगळता या कार्यक्रमला खंड पडला नाही. पौराणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी विषयावरती कलगीतुरा म्हणणारे गायक व त्याची साथीदार बहारदार कार्यक्रम करतात. लोणी मधील पंचरास मंडळी या कार्यक्रमाचे सुरुवात नांदीने करतात.
सदर कार्यक्रमासाठी सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, उद्योजक वसंत पडवळ, संतोष वाळुंज, तानाजी राजगुडे, धों. स. सुतार गुरुजी, जनकल्याण पतसंस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज, सहारा उद्योग समूह समूहाचे नामदेवराव वाळुंज, शिवाजी गेनभाऊ शिनलकर, बबनराव चौधरी, सदस्य रुक्मिणी वाळुंज आदी मान्यवर उपस्थित राहणारआहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलगीतुरा अभ्यासक लोणी गावचे माजी सरपंच उद्धवराव लंके करतात. सवाल जवाबा चे योग्य परीक्षण करून प्रश्न उत्तर बरोबर आहे की नाही हे श्रोत्यांना समजावून सांगतात. सदर कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावावी, असे आवाहन लोणी ग्रामस्थांनी व कलगीतुरा मंडळ यांनी केले आहे.
नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…
नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…
नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…
नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…