महाराष्ट्र

पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

पुणे: राज्यातील पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय जारी केला.

राज्यात सारथी, बार्टी, महाज्योति या संस्थांच्या माध्यमातून मराठा-कुणबी प्रवर्ग, एस.सी., ओबीसी प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. मात्र आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे संशोधन सहाय्य दिले जात नव्हते. त्यामुळे आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालिन आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना पत्र पाठवून संशोधन अधिछात्रवृत्तीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली होती.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३ फेब्रुवारी रोजी पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती देण्याचा शासन निर्णय जारी केला असून राज्यातील आदिवासी क्षेत्राबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा २०५०० इतकी अधिछात्रवृत्ती मिळणार असून आकस्मिक खर्च व घरभाडे भत्ता तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा २००० रुपये सहाय्य अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

45 मिनिटे ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago