महाराष्ट्र

पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश 

पुणे: राज्यातील पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय जारी केला.

राज्यात सारथी, बार्टी, महाज्योति या संस्थांच्या माध्यमातून मराठा-कुणबी प्रवर्ग, एस.सी., ओबीसी प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. मात्र आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे संशोधन सहाय्य दिले जात नव्हते. त्यामुळे आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालिन आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना पत्र पाठवून संशोधन अधिछात्रवृत्तीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली होती.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३ फेब्रुवारी रोजी पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती देण्याचा शासन निर्णय जारी केला असून राज्यातील आदिवासी क्षेत्राबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा २०५०० इतकी अधिछात्रवृत्ती मिळणार असून आकस्मिक खर्च व घरभाडे भत्ता तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा २००० रुपये सहाय्य अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

13 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

19 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

19 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

19 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

19 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago