CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 55?
मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे.
मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं.
सीबीडीटीनं अधिसूचना जारी करून 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
पॅन लिंक नसेल तर काय होणार
बँक खाते उघडता येणार नाही
डिमॅट खाते उघडता येणार नाही
शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री करता येणार नाही
50,000 रुपयांपेक्षा जास्त FD करता येणार नाही
सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही
बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणार नाही
घर किंवा वाहन खरेदी करताना समस्या
परकीय चलन व्यवहार थांबतील
टॅक्स रिफंड मिळणार नाही
टीडीएस आणि टीसीएस जास्त दराने कपात होईल
पॅन-आधार लिंक कसं करायच
www.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर जा
डाव्या बाजूला Link Aadhaar पर्याय निवडा
पॅन आणि आधार क्रमांक टाका
Validate क्लिक करा
ओटीपी टाका आणि लिंक पूर्ण होईल
`जर आधीच लिंक असेल तर तसा मेसेज दिसेल.
एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंक
संदेश टाईप करा: UIDPAN<स्पेस><आधार क्रमांक><स्पेस><PAN>
उदाहरण: UIDPAN 111122223333 AAAPA9999Q
हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा
अंतिम मुदत चुकली तर
जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंक केलं नाही तर
पॅन निष्क्रिय होईल
पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल
पॅन सक्रिय होण्यासाठी 7 दिवस ते 1 महिना लागू शकतो.
काय करावं
आजच पॅन आणि आधार लिंक करा
आधारवरील मोबाईल नंबर अपडेट आहे का तपासा
ई-फायलिंग पोर्टलवर स्टेटस पाहा
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…