CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 55?
मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे.
मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं.
सीबीडीटीनं अधिसूचना जारी करून 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
पॅन लिंक नसेल तर काय होणार
बँक खाते उघडता येणार नाही
डिमॅट खाते उघडता येणार नाही
शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्री करता येणार नाही
50,000 रुपयांपेक्षा जास्त FD करता येणार नाही
सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही
बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणार नाही
घर किंवा वाहन खरेदी करताना समस्या
परकीय चलन व्यवहार थांबतील
टॅक्स रिफंड मिळणार नाही
टीडीएस आणि टीसीएस जास्त दराने कपात होईल
पॅन-आधार लिंक कसं करायच
www.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर जा
डाव्या बाजूला Link Aadhaar पर्याय निवडा
पॅन आणि आधार क्रमांक टाका
Validate क्लिक करा
ओटीपी टाका आणि लिंक पूर्ण होईल
`जर आधीच लिंक असेल तर तसा मेसेज दिसेल.
एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंक
संदेश टाईप करा: UIDPAN<स्पेस><आधार क्रमांक><स्पेस><PAN>
उदाहरण: UIDPAN 111122223333 AAAPA9999Q
हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा
अंतिम मुदत चुकली तर
जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंक केलं नाही तर
पॅन निष्क्रिय होईल
पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल
पॅन सक्रिय होण्यासाठी 7 दिवस ते 1 महिना लागू शकतो.
काय करावं
आजच पॅन आणि आधार लिंक करा
आधारवरील मोबाईल नंबर अपडेट आहे का तपासा
ई-फायलिंग पोर्टलवर स्टेटस पाहा
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…