संभाजीनगर: राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा* केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून, वर्षानुवर्षे अडकलेली शेतीविक्रीची प्रकरणं मार्गी लागणार आहे.
काय होता तुकडेबंदी कायदा
महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतीजमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. यामुळे विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा छोट्या व्यवहारासाठी जमीन खरेदी करणं अवघड झालं होतं. या कायद्याच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने व न्यायालयीन लढाही झाला.
काय होणार आता?
१ जानेवारी २०२५* पर्यंत जे तुकडे झाले आहेत, ते कायदेशीर मानले जातील.
महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त यांची *विशेष समिती गठित केली जाणार* आहे.
१५ दिवसांत एसओपी (Standard Operating Procedure)* जारी होणार आहे.
यामुळे छोटे तुकडे विक्रीसाठी खुले होणार असून *शेतकऱ्यांना व्यवहार करताना मोकळीक मिळणार आहे.
विरोधी पक्षांचं स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे *जयंत पाटील* आणि आमदार *विजय वडेट्टीवार* यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वडेट्टीवार यांनी सांगितलं की, “या कायद्यामुळे अनेक दलालांनी लोकांची फसवणूक केली आणि काहींनी तर आत्महत्या देखील केल्या. आता हा अन्याय संपणार आहे.”
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय
हा निर्णय म्हणजे *लाखो शेतकऱ्यांना नवा श्वास* आहे. विशेषतः जे शेतकरी विहिरीसाठी, पाइपलाइनसाठी, रस्त्यासाठी लहान जागा खरेदी करत होते, त्यांना आता दिलासा मिळणार आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…