२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी
औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे.
१२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात
प्राथमिक व माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल. दरम्यान, कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळा सुटीत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. जेणेकरून पटसंख्या कमी होणार नाही, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सत्र परीक्षा उरकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती समजणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष देणे सोयीचे होणार आहे. परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करून १ मे रोजी तो प्रसिद्ध होईल. १ मे ते ११ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…