महाराष्ट्र

औट्रम घाटात होणार देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

संभाजीनगर: प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर – कन्नड – चाळीसगाव या ९३ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या मार्गावर औट्रम घाटात तब्बल १७.५ कि.मी. लांबीचा स्वतंत्र रेल्वे बोगदा होणार आहे, जो देशातील सर्वात लांब ठरेल.

खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, आधी रेल्वे व रस्ते वाहतुकीसाठी एकत्रित बोगद्याचा विचार होता, पण आता वेगळे बोगदे होणार आहेत.

धाराशिव – बीड – संभाजीनगर – चाळीसगाव रेल्वे कॉरिडॉर

या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.  छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

संभाजीनगर – अंकाई (मनमाड) दुहेरीकरण वेगात

९८.२५ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या अंकाई – करंजगावदरम्यानचे माती काम ४५% पूर्ण झाले असून पुलांचे काम झाल्यानंतर रेल्वे ट्रॅक टाकण्यात येईल.  २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

छ. संभाजीनगर – परभणी दुहेरीकरण

या १७७.२९ कि.मी. अंतरासाठी २,१७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.

वेरुळ – घृष्णेश्वराला रेल्वे कनेक्टिव्हिटी

या नव्या मार्गामुळे वेरुळ- ज्योतीलिंग घृष्णेश्वर देखील रेल्वे नकाशावर येणार आहे, ज्यामुळे पर्यटनाला मोठा बूस्ट मिळेल.

संभाजीनगर – अहिल्यानगर रेल्वेमार्ग

प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ कि. मी. अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.

हा रेल्वेमार्ग ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल २ लाइन’चा करण्यात येणार आहे.

हा मार्ग विद्युतीकरणासह दुहेरी 3 लाइनचा होईल. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

3 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

3 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

14 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago