महाराष्ट्र

त्या ज्येष्ठ नेत्याच्या नातवावर बिबट्याचा धक्कादायक हल्ला

सातारा: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे गावात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अधिराज पाटील यांना पायाला दुखापत झाली, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर, जे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) चे नेते आहेत, येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी जात असताना, उंडाळे गावात बिबट्याने अधिराज पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांच्या सोबत असलेले दुचाकी चालक धनाजी पाटील या देखील थोडक्यात बचावले.

घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उंडाळे–शेवाळवाडी मार्गावर घडली. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि डॉक्टरांच्या पाहणीनंतर अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिकांनी बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे अधिक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत चालल्याने ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही बिबट्यांचा वावर वाढला आहे. लोकांचा आरोप आहे की अधिवास सोडून बिबट्या गाव आणि शहरांमध्येही दिसत आहेत.याबाबत आता बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी जोर धरत आहे, तर वन्यजीवप्रेमी या उपाययोजनेच्या विरोधात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

12 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

12 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

12 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

14 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

14 तास ago