मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली.
कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव (ता. लांजा) यांच्यातर्फे शाहिर संजय जोशी यांनी कोकणची पारंपरिक लोककला शक्ति तुरा सादर केली. याशिवाय, हातीसगावच्या भैरी जुगाई पालखी पथकाने पारंपरिक पालखी नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाच्या या रंगतदार सुरुवातीमुळे संपूर्ण वातावरण लोककलेच्या सुरेल आणि उत्साही रंगात न्हाऊन निघाले.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…