मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली.
कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव (ता. लांजा) यांच्यातर्फे शाहिर संजय जोशी यांनी कोकणची पारंपरिक लोककला शक्ति तुरा सादर केली. याशिवाय, हातीसगावच्या भैरी जुगाई पालखी पथकाने पारंपरिक पालखी नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाच्या या रंगतदार सुरुवातीमुळे संपूर्ण वातावरण लोककलेच्या सुरेल आणि उत्साही रंगात न्हाऊन निघाले.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…