महाराष्ट्र

आज राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांचे निदर्शने…

औरंगाबाद: महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद व नाशिक शहरा मध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी स्थापन करुन त्या ठिकाणी वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या आहे.तसेच उत्तरप्रदेश मधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात ७२ तासाचा यशस्वी संप केला व सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले.

महाराष्ट्र सरकारने स्थायी मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने कामगार भरण्याचा जो निर्णय घेतला त्यास विरोध.राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या व इतर मागण्याकरीता पुकारलेल्या बेमुदत संपात पाठिंबा देण्याचा महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभिंयते अधिकारी संघर्ष समितीच्या (दि. 19) रोजी झालेल्या बैठकी मध्ये निर्णय घेण्यात असून उद्या (मंगळवार) (दि. २1) रोजी महाराष्ट्रभर वीज कंपन्यातील ८६००० कर्मचारी, अभियंते व अधिकारी द्वारसभा घेऊन निदर्शने करत संपात पाठिंबा देणार आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर द्वारसभा घेऊन निदर्शने करावी.

आपले विनीत

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

14 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

14 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

14 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

14 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

19 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

19 तास ago