शिरूर तालुका

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे.

उरळगाव (ता. शिरुर) येथील रहिवाशी असलेले आदर्श ग्रामविकास अधिकारी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस हे प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी अंध अपंग व्यक्तींना आपल्या वाहनातून त्यांच्या प्रवासाच्या ठिकाण पर्यंत मदतीचा हात देण्याचे कार्य करत असून नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका अंध व्यक्तीला आपल्या वाहनातून मदत करत असताना त्यांनी सदर व्यक्तीशी संवाद साधत असताना सोशल मीडियातून नागरिकांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात असलेले अंध, अपंग व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती मध्ये काम करत त्यांची कला जोपासण्याचे काम करत असतात. शासनाकडून ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी अपंग कल्याणासाठी राखीव असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींची कामे सहानुभूतीने व गांभीर्याने करा, असे आवाहन देखील पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

9 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

9 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago