शिरूर तालुका

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे.

उरळगाव (ता. शिरुर) येथील रहिवाशी असलेले आदर्श ग्रामविकास अधिकारी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस हे प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी अंध अपंग व्यक्तींना आपल्या वाहनातून त्यांच्या प्रवासाच्या ठिकाण पर्यंत मदतीचा हात देण्याचे कार्य करत असून नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका अंध व्यक्तीला आपल्या वाहनातून मदत करत असताना त्यांनी सदर व्यक्तीशी संवाद साधत असताना सोशल मीडियातून नागरिकांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात असलेले अंध, अपंग व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती मध्ये काम करत त्यांची कला जोपासण्याचे काम करत असतात. शासनाकडून ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी अपंग कल्याणासाठी राखीव असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींची कामे सहानुभूतीने व गांभीर्याने करा, असे आवाहन देखील पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

5 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

5 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

5 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

5 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago