शिरूर तालुका

कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नादुरुस्त झालेली असल्याने यापूर्वी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार विनंती करत लेखी पत्राद्वारे शाळेला चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून संगणक संच देणे, शाळेच्या इमारतीच्या दरवाजा व खिडक्या दुसदुरुस्त करणे, अंगणवाडी छत दुरुस्त करणे, शाळेसाठी पाण्याची टाकी उपलब्ध करणे, किचन शेड दुरुस्त करणे यांसह आदी कामांची शाळेसाठी मागणी करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन फक्त आश्वासन देत असून कोणतीही ठोस कार्यवाही करत नाही, तसेच याबाबत ग्रामसभेत चर्चा होऊन देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने सदर कामांच्या अंमलबजावणी न केल्यास एक ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे.

कामांबाबत प्रक्रिया झालेली असून लवकर कामे होतील; वसंत पवार

कासारी शाळेच्या कामासाठी नवनाथ भुजबळ यांनी केलेल्या मागण्यांबाबत प्रक्रिया झालेल्या असून दहा ते पंधरा दिवसात कामांना सुरुवात केली जाईल, असे कासारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

3 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

10 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

10 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

10 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

10 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago