शिरूर तालुका

संततधार पावसामुळे शिरूर, शिक्रापूर महावितरणकडून शेतकरी व वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद माने व शिक्रापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “सध्या पावसामुळे जमीन ओली झाल्याने वीज वाहिन्यांवर झाडे पडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच वारंवार वीजतारा तुटून शेतामध्ये किंवा रस्त्यावर पडू शकतात. अशा वेळी शेतकरी व नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा करू नये.”

तुटलेल्या वीजतारांना कधीही हात लावू नये.तुटलेले तारे दिसल्यास सुरक्षित अंतरावरून इतरांना सावध करावे.अशा घटना आढळल्यास नजिकच्या महावितरण कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा.पावसाळ्यात ओल्या हातांनी वीज उपकरणे वापरणे टाळावे.उपकार्यकारी अभियंता माने व जाधव यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांनी थोडी दक्षता घेतली तर मोठे अपघात टाळता येऊ शकतात. महावितरणकडून तातडीने कार्यवाही करण्यासाठी नागरिकांनी तुटलेल्या तारांची माहिती द्यावी. सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचे काही नाही.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

7 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

7 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

7 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

7 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

9 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

9 तास ago