शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद माने व शिक्रापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “सध्या पावसामुळे जमीन ओली झाल्याने वीज वाहिन्यांवर झाडे पडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच वारंवार वीजतारा तुटून शेतामध्ये किंवा रस्त्यावर पडू शकतात. अशा वेळी शेतकरी व नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा करू नये.”
तुटलेल्या वीजतारांना कधीही हात लावू नये.तुटलेले तारे दिसल्यास सुरक्षित अंतरावरून इतरांना सावध करावे.अशा घटना आढळल्यास नजिकच्या महावितरण कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा.पावसाळ्यात ओल्या हातांनी वीज उपकरणे वापरणे टाळावे.उपकार्यकारी अभियंता माने व जाधव यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांनी थोडी दक्षता घेतली तर मोठे अपघात टाळता येऊ शकतात. महावितरणकडून तातडीने कार्यवाही करण्यासाठी नागरिकांनी तुटलेल्या तारांची माहिती द्यावी. सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचे काही नाही.”