रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात पावसाने अजून माघार घेतलेली नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे.
याबाबत राज्य सरकारने पाहणी करुन त्वरित पंचनामे करावेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र च्या वतीने शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…
शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…
शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…