शिरूर तालुका

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात पावसाने अजून माघार घेतलेली नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे.

याबाबत राज्य सरकारने पाहणी करुन त्वरित पंचनामे करावेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र च्या वतीने शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

4 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago