शिरूर तालुका

विठ्ठलवाडीत बिबट्याच्या अफवेने उडाली खळबळ

वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक ऊस तोड सुरु असताना शेतात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जात शेताची पाहणी करत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक महादेव गवारे यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना शेतात बिबट्याचे पिल्ले दिसल्याचे ऊसतोड कामगारांनी सांगितले. याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कुंभार, प्रशांत गवारे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली यावेळी वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात पाहणी केली असता शेतात कोठेही बिबट्याचे पिल्ले अथवा बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.

यावेळी वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बिबट्यांबाबत जनजागृती करत योग्य खबरदारीच्या सूचना देखील केल्या आहे. मात्र सदर ठीकांनी बिबट्यांच्या अफवेने खळबळ उडाली असून कोठेही बिबट्या अथवा बिबट्याची पिल्ले आढळून आल्यास शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन वनरक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

2 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

2 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

13 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

13 तास ago