शिरूर तालुका

शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान!

शिरूर (अरुणकुमार मोटे): कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस “जनकल्याण सेवा सन्मान”हा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा नुकताच कराड येथे पार पडला .यावेळी सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संजय सुड्रिक व चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शिरूर येथे आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही गेल्या आठ वर्षांपासून विशेष मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. मुलांना दैनंदिन, शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्य शिकवून सक्षम बनविणे, मुलांचे खुशी निवासी केंद्र मध्ये संगोपन व सांभाळ केला जातो. वैवाहिक, कौटुंबिक समुपदेशन करणे यासाठी संस्था कार्य करत आहे.

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या संस्थापिका ॲड. राणी ताई चोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अविनाश धर्माधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन कौतुक केले. यावेळी जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके आदी उपस्थित होते.

राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

1 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

1 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

1 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

13 तास ago