शिरूर तालुका

शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान!

शिरूर (अरुणकुमार मोटे): कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस “जनकल्याण सेवा सन्मान”हा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा नुकताच कराड येथे पार पडला .यावेळी सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संजय सुड्रिक व चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शिरूर येथे आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही गेल्या आठ वर्षांपासून विशेष मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. मुलांना दैनंदिन, शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्य शिकवून सक्षम बनविणे, मुलांचे खुशी निवासी केंद्र मध्ये संगोपन व सांभाळ केला जातो. वैवाहिक, कौटुंबिक समुपदेशन करणे यासाठी संस्था कार्य करत आहे.

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या संस्थापिका ॲड. राणी ताई चोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अविनाश धर्माधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन कौतुक केले. यावेळी जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके आदी उपस्थित होते.

राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

4 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

6 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

11 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

11 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

11 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

11 तास ago