mobile
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीने मोबाईल खरेदी केला होता. पण, मोबाईलमधील कॉल रेकॉर्डींग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकदा कंपनीकडे तक्रार केली. अखेर, जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसीमुळे रक्कम व्याजासह देण्याचा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेश दिला आहे.
मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग चालू केले की समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे समोरची व्यक्ती बोलायचे टाळतात. असे प्रकार काही मोबाईल कपंन्याकडून घडत आहे. याबाबत व्यथित होऊन मंगेश बाळासाहेब लंघे (रा. सविंदणे, ता. शिरूर) यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथील अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण आयोगात खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये दोष असल्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आयोगाने २५ ऑगस्ट २०२३ रोजी निकाल दिला असून, मोबाईल कंपनी व विक्रेता यांनी दोष असलेला मोबाईल परत घेऊन संपूर्ण रक्कम तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक ९ टक्के व्याजाने परत करण्याचे व मानसिक त्रासापोटी ५०००व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च १ हजार देण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगेश लंघे यांनी ओप्पो कंपनीचा नवीन मोबाईल खरेदी केला होता. त्याच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते जेव्हाही कॉल रेकॉर्ड चालू करत, तेव्हा समोरील व्यक्तीला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे समोरची व्यक्ती बोलायचे टाळत असे किंवा फोन बंद करत असत. त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या सेटिंगमध्ये अनेक बदल केले. परंतु हा प्रकार दूर झाला नाही. याबाबत त्यांनी मोबाईल खरेदी केलेल्या शिरूर येथील गोविंद कम्युनिकेशन’च्या दुकानदारास तक्रार केली. परंतु, दोष कंपनीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंगेश यांनी मोबाईल कंपनीला ईमेलद्वारे व हेल्पलाईनवर तक्रार दाखल केली होती.
मोबाईल रेकॉर्डिंगचा दोष गुगलच्या डायल पॅडचा असल्याचे सांगत गुगलसोबत बोलून दोष दूर करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकदा संपर्क करून दोष दूर न झाल्याने मंगेश यांनी पुणे येथील अतिरिक्त जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला होता.
जिल्हा तक्रार निवारण आयोगाने बजावलेल्या नोटीसला ओप्पो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हरियाना, विक्रेते गोविंद कम्युनिकेशन शिरूर यांनी उत्तर दिले नाही. आयोगासमोर हजर राहून कोणतेही म्हणणे सादर न केल्याने आयोगाने एकतर्फी निकाल दिला. मोबाईल कंपनी व विक्रेता यांनी दोष असलेला ओप्पो कंपनीचा ए-५३/६/१२८ मोबाईल परत घेऊन त्यापोटी स्वीकारलेली १५ हजार ५०० रक्कम तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक ९ टक्के व्याजाने परत करण्याचे व मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च १ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद
मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…