शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तहसीलचा दुसरा एक अजब कारभार समोर आला आहे. शिंदोडी गावात अवैध माती उपशाबाबत तलाठी अलिशा महाकाल यांनी आधी पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मातीचोरी केल्याची शिरुर पोलिस स्टेशन येथे मंडल अधिकारी संपत खरात यांनी तक्रार दाखल केली.
अॅड विनायक लक्ष्मण फडके (रा. यशोदिप सोसायटी,वारजे माळवाडी, पुणे) यांच्या शिंदोडी गावातील गट नं २२३ च्या लगत असणाऱ्या मळईतुन अवैध माती उत्खनन करुन ती माती गावातील इतर लोकांना विकल्याचा प्रकार झाला होता. याबाबत विनायक फडके यांनी २८ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी शिंदोडी च्या तलाठी अलिशा महाकाल यांनी उत्खनन केलेल्या जागेवर जाऊन पंचनामा केला होता.
त्यानंतर विनायक फडके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर उशिरा जाग आलेल्या महसूल खात्याने तब्बल एक महिन्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी मंडल अधिकारी संपत खरात यांनी शिंदोडी येथील गट नं २२३ आणि गट नं २१७ मधुन अज्ञात व्यक्तीनी ६ लाख ४४ हजारांची मातीचोरी केल्याची तक्रार दाखल केली. तलाठी यांनी पंचनामा केल्यानंतर अवैध माती उत्खनन करणारी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई करणे अपेक्षित असताना महसूलच्या अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत टाळाटाळ केली.
त्यामुळे त्यानंतरही अवैध माती उत्खनन सुरुच राहिल्याने विनायक फडके यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे खनिकर्म विभाग, पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर दि १३ मे २०२५ रोजी शिरुर पोलिस येथे अजित ओव्हाळ, नंदु ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई आण्णा माने, राजेंद्र उमाजी माने (सर्वजण, रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) या पाच व्यक्तीविरोधात अवैध माती उत्खनन केल्याप्रकरणी फडके यांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
(क्रमशः)
शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श
शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ
शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…