शिरूर तालुका

बाल दिनानिमित्त शिक्षकाकडून आदिवासी मुलांना मायेची उब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक असलेले मायेची उब फाउंडेशनचे संस्थापक राहुल चातुर हे गेली अनेक वर्षापासून थंडीच्या दिवसांमध्ये आदिवासी मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असून त्यांनी नुकतेच काही सहकाऱ्यांच्या मदतीने आदिवासी मुलांना बाल दिनाच्या निमित्ताने उबदार कपड्यांचे वाटप केल्याने आदिवासी मुलांना मायेची उब मिळाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक राहुल चातुर यांनी पिंपरी दुमाला शालेय समितीच्या अध्यक्षा कल्पना खळदकर व ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर यांच्या मदतीने आंबेगाव तालुक्यातील तिरपाड केंद्रातील बालवीर वाडी, पिंपरगणे, न्हावेड, सडकेची वाडी व कापरवाडी या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मायेची उपक्रमा अंतर्गत उबदार रजई, चादर, कानटोपी यांसह आदी साहित्याचे वाटप केले, याप्रसंगी सरपंच सोमा दाते, केंद्रप्रमुख सखाराम गेंगजे, मच्छिंद्र झांजरेसर, शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर शेखरे, कल्याण कोकाटे, संपदा गाढवे, लता नलावडे, वैशाली भालेराव, संगीता नवले, शोभा खरगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदिवासी भागातील मुलांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे मायेची उब फाउंडेशनचे संस्थापक राहुल चातुर यांनी सांगितले. तर यावर्षी जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 200 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कल्याण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी जावजी गवारी यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

18 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

22 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

27 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

34 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago