शिरूर तालुका

मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तीन भावंडांनी शाळेसाठी केली लाखों रुपयांची जमीन दान

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील जगतापवाडी तील तीन भावंडांनी गोर-गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेला तब्बल सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे. मांडवगण परीसरात शेत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना शाळेसाठी सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केल्याने जगताप कुटुंबियांवर आसपासच्या परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

जगतापवाडी हा परिसर मांडवगण फराटा गावापासून तीन ते चार किलोमीटर लांब आहे. येथील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गावात यावे लागत होते. शेतमजुरांच्या मुलांसह गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी येथील शेतकरी राजेंद्र पोपटराव जगताप, संजय पोपटराव जगताप व कांतीलाल पोपटराव जगताप या तीन भावंडांनी आजोबा स्वर्गीय बयाजी शंकरराव जगताप आणि वडील स्वर्गीय पोपटराव बयाजी जगताप यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सात गुंठे जमीन दान केली आहे.

 

मांडवगण फराटा येथील जगतापवाडी हा परीसर बारमाही बागायती आहे. ऊस, कांदा, कापुस, डाळींब, केळी, खरबुज, कलिंगड हि पिके येथे चांगल्या प्रकारे पिकत आहेत. येथील जमिनींना साधारणतः तीस ते चाळीस लाख रुपयांचा एकरी बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपयांची जमीन दान केल्याने या भावंडांचे कौतुक होत असुन या कुटुंबाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

मांडवगण फराटा गावच्या सरपंच समिक्षा कुरुमकर, उपसरपंच पांडुरंग मोरे. अशोक जगताप, प्रतिक्षा जगताप, प्रविण जगताप, सोमनाथ जगताप, प्रविण शितोळे, मुख्याध्यापक थोरात व जगताप कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

रांजणगाव गणपती; मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना, पोलिस निरीक्षक अनिता खेडकर

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

18 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

18 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

18 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

18 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

20 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

20 तास ago