मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील जगतापवाडी तील तीन भावंडांनी गोर-गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेला तब्बल सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे. मांडवगण परीसरात शेत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना शाळेसाठी सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केल्याने जगताप कुटुंबियांवर आसपासच्या परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जगतापवाडी हा परिसर मांडवगण फराटा गावापासून तीन ते चार किलोमीटर लांब आहे. येथील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गावात यावे लागत होते. शेतमजुरांच्या मुलांसह गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी येथील शेतकरी राजेंद्र पोपटराव जगताप, संजय पोपटराव जगताप व कांतीलाल पोपटराव जगताप या तीन भावंडांनी आजोबा स्वर्गीय बयाजी शंकरराव जगताप आणि वडील स्वर्गीय पोपटराव बयाजी जगताप यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सात गुंठे जमीन दान केली आहे.
मांडवगण फराटा येथील जगतापवाडी हा परीसर बारमाही बागायती आहे. ऊस, कांदा, कापुस, डाळींब, केळी, खरबुज, कलिंगड हि पिके येथे चांगल्या प्रकारे पिकत आहेत. येथील जमिनींना साधारणतः तीस ते चाळीस लाख रुपयांचा एकरी बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपयांची जमीन दान केल्याने या भावंडांचे कौतुक होत असुन या कुटुंबाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मांडवगण फराटा गावच्या सरपंच समिक्षा कुरुमकर, उपसरपंच पांडुरंग मोरे. अशोक जगताप, प्रतिक्षा जगताप, प्रविण जगताप, सोमनाथ जगताप, प्रविण शितोळे, मुख्याध्यापक थोरात व जगताप कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर
'महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी' म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत…
मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व…
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई:…
मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची…
मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण…