PM-Kisan
मुंबई: PM किसान या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 असुन जे शेतकरी KYC करणार नाहीत, त्यांना 12 वा हप्ता मिळणार नसल्याचे सरकारने म्हंटले आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाते. मात्र ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत.
PM किसान साठी दोन प्रकारे e-KYC करता येते. जर शेतकऱ्यांनी स्वत: OTP द्वारे e-KYC केले तर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. मात्र कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन e-KYC करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. यातील पहिली केवायसी प्रक्रिया PM किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन करता येते. याशिवाय, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही KYC करता येते. PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असुन या योजने अंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांना सरकार कडून दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…