मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आज विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतात अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत आ. सुनील शिंदे, आ. विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी ठोस निर्णयाची मागणी केली.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी या विषयावर तात्काळ बैठक आयोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच आजच बैठकीची तारीख जाहीर करण्यास सांगितले. नवी मुंबईत दहा वर्षांपूर्वी डोंगर दिसत होते. ते आता भुईसपाट होताना दिसतात. त्यामुळे कालमर्यादा ठरवली पाहिजे अन्यथा सगळीकडचे डोंगर संपतील का काय, असा प्रश्न निर्माण होईल, असेही सूचित केले. यावर महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ मार्च रोजी बैठक घेतली जाईल आणि सुरु असलेल्या उत्खननाला तात्काळ स्थगिती देण्यात येईल असे सभागृहाला सांगितले.
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…
शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…
शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…