इतर

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून वृद्ध महिलेने घेतले पेटवून

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवली होती. दरम्यान रविवार (दि. २४) रोजी कामिका एकादशी होती. त्यामुळे कावेरी भोसले यांनी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास हरिपाठ म्हटला. कुटुंबातील सदस्य झोपण्यासाठी गेले असता, त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर कावेरी यांनी बाथरुममध्ये जाऊन आधी सुती कापड हाताला गुंडाळले. त्यावर गावरान तूप ओतले. काही तूप अंगालाही लावले. त्यांनतर काडी ओढून त्यांनी स्वतः पेटवून घेतले. तूप टाकलेले असल्याने कापडाने लगेचच पेट घेतला. ज्यात कावेरी भोसले यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या आजारपणालाही कावेरी भोसले कंटाळल्या होत्या. त्यांना हृदयाचा आजार होता. तर एका खासगी रुग्णालयात बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. विशेष म्हणजे ढगाळ वातावरणात त्यांना अधिक त्रास व्हायचा. त्यामुळे सुद्धा कावेरी भोसले यांनी आत्महत्या केली असावा असाही अंदाज पोलिसांना आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

3 मिनिटे ago

गैरसमज दूर होईल; मनोज जरांगेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा…

6 मिनिटे ago

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर 'डबल ढोलकी' वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही…

12 मिनिटे ago

शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ‘शिवसेना कोणाची हे जनतेनेच ठरवलं’, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद; ६० आमदारांच्या जनादेशाचा शिंदेंनी केला उल्लेख मुंबई: शिवसेना पक्ष,…

19 मिनिटे ago

‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि 'डोह'कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार…

31 मिनिटे ago

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही,…

33 मिनिटे ago