अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाचा जाब; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शिक्षण विभागाला इशारा

मुंबई: ७ जूनपासून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, वेळापत्रकातील अनिश्चितता आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात सापडले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज उपसंचालक आणि सहाय्यक संचालक (शालेय शिक्षण), मुंबई विभाग यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जेवणाच्या बिलावरुन तरुणावर लोखंडी खुर्चीने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे जेवणाचे बिल न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातुन दोघा तरुणांनी एकास शिवीगाळ व मारहाण करुन लोखंडी खुर्ची डोक्यात मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकसांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी करण चंद्रकांत वाळुंज (वय २४) रा. पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा 

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील

पुणे: ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात […]

अधिक वाचा..

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्रसरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी तातडीने पाठवावेत

मुंबई: रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्रसरकारच्या ‘प्रसाद’ (तिर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तातडीने केंद्रसरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजूरीसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करतानाच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना ॲड. अमोल मातेले यांचे निवेदन

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी, प्रशासनाची ढिसाळ तयारी आणि परिणामी विद्यार्थ्यांना व पालकांना भेडसावणाऱ्या मानसिक त्रासाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सविस्तर निवेदन ईमेलद्वारे पाठवले आहे. ७ जून २०२५ पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण

मुंबई: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर […]

अधिक वाचा..

अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदींची दुरुस्ती होणार

मुंबई: मराठा साम्राज्याची राजधानी, ऐतिहासिक शहर साताऱ्यातील संगम माहूलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील काशीविश्वेश्वर, संगमेश्वर, रामेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, झुलत्या भग्न पदपुलाच्या नवनिर्माणासह घाटपरिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना, स्वराज्यनिर्मितीसह […]

अधिक वाचा..