उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे “बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना” असल्याची टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित कार्यक्रमानंतर […]

अधिक वाचा..

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा प्रकल्पांचाही शुभारंभ ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सुमारे ₹२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील दीड वर्षांत तीन हात नाका […]

अधिक वाचा..

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा आरोप मुंबई: उच्च शिक्षणातील ६५९ पदांच्या भरतीची घोषणा करून राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. २०२२ पासून सरकार सातत्याने भरतीच्या घोषणा करत असले […]

अधिक वाचा..

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात घोषणाबाजी केली. या काळात आंदोलनावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला, तर आंदोलनकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण ही महायुती सरकारची त्रिसूत्री असल्याचे सांगत ‘शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे’ हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते […]

अधिक वाचा..

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत परळी : परळी औष्णिक ऊर्जा केंद्रातून निर्माण होणाऱ्या फ्लाय अॅश आणि पाँड राखेच्या विक्रीत पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ₹३५ कोटी ९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक महसूल […]

अधिक वाचा..

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक सीमा आणि भूभागांचा देश नसून तो संस्कृती, परंपरा, शौर्य, कष्ट आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा संगम असल्याचे प्रतिपादन “आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान” या लेखातून करण्यात आले आहे. विकसित आणि शक्तिशाली भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, […]

अधिक वाचा..

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध मुंबई : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या कठोर उपाययोजनांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य […]

अधिक वाचा..

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असून, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सपकाळ म्हणाले की, […]

अधिक वाचा..