क्राईम

पुणे नगर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

शिक्रापूर पोलिसांच्या पथकांकडून चोरट्यांचा पाठलाग

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नागरिकांना मारहाण करत लुटमार करत चांगलाच धुमाकूळ घातला असून शिक्रापूर पोलिसांनी सतर्कता राखत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या सतर्कतेने अन्य अनर्थ टळले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे कर्तव्य बजावत असताना कोरेगाव भीमा येथे एका युवकाला काही चोरट्यांनी मारहाण करत त्याचे पैसे काढून घेत शेजारील एका सोसायटी मधील दुचाकी चोरून नेल्याबाबतचा फोन पोलीस स्टेशन येथे आला त्यांनी तातडीने रात्रगस्त साठी असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना माहिती दिली.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई अतुल पखाले हे कोरेगाव भीमा येथे गेले असता त्याच वेळी काही मिनिटांनी सदर चोरट्यांनी शिक्रापूर एल अँड टी फाटा येथे देखील एका युवकाला मारहाण करुन जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत त्या युवकाला उपचारासाठी हलवले.

मात्र चोरटे एल अँड टी फाट्याहून तळेगाव ढमढेरेकडे गेले कि फाटा भारत गॅस फाट्याकडे गेले कळेना त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सदर चोरट्यांनी अन्य कोणाला मारहाण करु नये व काही अनर्थ घडू नये, यासाठी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई अतुल पखाले, विकास मोरे, स्वप्नील गांडेकर यांचे दोन पथके बनवून भारत गॅस व तळेगाव ढमढेरे बाजूकडे पाठवले.

दरम्यान करंदी फाटा येथे दुचाकीहून गेलेले संशयित दोन युवक पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांना दिसले यावेळी पोलीस आल्याची चाहुन लागताच सदर युवक कोरेगाव भीमा येथून चोरुन आणलेली दुचाकी तेथेच सोडून जवळील एका इमारतीच्या भिंतीवरुन उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी पोलिसांच्या पथकाने करंदी गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांच्या मार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना संदेश देत माहिती दिल्याने नागरिक देखील जागे झाले. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी चोरट्यांचा आजूबाजूला शोध घेतला मात्र चोरटे मिळून आले नाही. मात्र पोलिसांनी तातडीने सतर्कता दाखवल्याने चोरट्यांकडून होणाऱ्या अन्य मारहाण तसेच चोरीच्या घटना रोखल्या गेल्या असून कोरेगाव भीमा येथे चोरट्यांनी चोरलेली दुचाकी देखील काही वेळेत मिळून आली असून पोलिसांच्या सतर्कतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

दोनच दिवसात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर

करंदी (ता. शिरुर) येथील ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बंद पडलेली असताना पोलीस पाटील वंदना साबळे यांनी स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु केली असताना दोनच दिवसात या ग्राम सुरक्षा यंत्रणेचे चांगला वापर दिसून आल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेचे महत्व दिसू लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

2 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago