क्राईम

पाबळमध्ये पोलिसांत तक्रार दिल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेल्या असताना तक्रारी मध्ये नाव का दिले असे म्हणून एका युवकाने भावकीतील एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अभिजित रघुनाथ पिंगळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे सोमनाथ पिंगळे व मिनिनाथ पिंगळे या दोन कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याने दोन्ही कुटुंबांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले त्यामध्ये अभिजित पिंगळे याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल असल्याने मंगेश पिंगळे हा त्याच्या गॅरेज मध्ये असताना अभिजित पिंगळे त्याच्या ताब्यातील एम एच १२ ए पी ००९० या पिकअप मधून मंगेशच्या गॅरेज समोर लाकडी दांडके घेऊन आला आणि मंगेशला शिवीगाळ दमदाटी करत केस मध्ये माझे नाव कोणी घेतले, असे म्हणून तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवत नाही, असे म्हणून बेदम मारहाण करत जखमी केले.

याबाबत मंगेश मिनिनाथ पिंगळे (वय २४) रा. माळतळवस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अभिजित रघुनाथ पिंगळे (वय २५) रा. माळतळवस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

3 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

10 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

10 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago