waghale-dp
शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी (डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर आता डीपी चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे.
वाघाळे येथे कॅनलवरील डीपी चोरीला…
वाघाळे येथील गट क्रमांक 100 मधील कॅनलवरील डीपी शुक्रवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली. सूर्यकांत बढे गुरुजी हे सकाळी शेतात जाण्यासाठी पायी निघाले असताना यांच्या निदर्शनास डीपीचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या घटनेप्रकरणी रांजणगाव कारेगाव पोलिस स्टेशन येथे एकनाथ डफळ व दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात व पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट…
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कसाबसा पिकांना पाणी देऊन त्यांचे संरक्षण करत आहेत. मात्र डीपी चोरीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महावितरणकडून तात्काळ डीपी देण्याची मागणी…
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरणने तात्काळ नवीन डीपी बसवावी, अशी मागणी केली आहे. “आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी,” अशी मागणी शामराव शेळके, रामदास गायकवाड, नवनाथ गावडे, सुरेश डफळ व सुधीर बढे यांनी केली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न…
शिरूर तालुक्यात वाढत्या डीपी चोरीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शेतकरी वीज यंत्रणांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.
शिरूर परिसरात महावितरणच्या चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच…
शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…
शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…