Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
सुभाष सीताराम शितोळे यांनी याबाबत शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा आऊट पोस्टमध्ये फिर्याद दाखल केली आहे. गावातील इतर व्यक्तींशी संपर्क साधला असता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नदीकाठावरील विद्युत पंप चोरीच्या घटना वारंवार होत असल्याचे सांगितले. पारगाव पुलाजवळील बंधाऱ्याजवळ परिसरातील नागरगाव, आंधळगाव, रांजणगाव सांडस या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीकाठी एकाच ठिकाणी अंदाजे चाळीस, पन्नास विद्युत पंप बसविले आहेत. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी येथील विद्युत पंपाचे पाइप कापून विद्युत पंप चोरून नेले आहेत. तसेच, दोन पाइप कापलेले विद्युत पंप जागेवरच सोडून चोरट्यांनी पळ काढला.
सुभाष पांढरे, गोपाळ भगवान साठे, सुनील रामदास साठे, शिवाजी किसन शेलार, चौरंगनाथ खंडेराव शेलार, संतोष कुल, ऋषिकेश शितोळे, विभीषण खुळे, भाऊ खुळे, अप्पासाहेब कोंडिबा साठे, सीताराम नलगे, सुभाष शितोळे या शेतकऱ्यांच्या नदीकाठी असणाऱ्या विद्युत पंपाची चोरी झाल्याचे सांगितले आहे.. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहेत…
शिरूर पोलिस स्टेशनला एक महिन्यापूर्वी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पदभार घेतला आहे. दबंग पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वी त्यांनी अनेक कठीण गुन्ह्यांची उकल केली असून, त्यांच्यापुढे आता विद्युत रोहीत्र, विद्युत पंप, केबल या चोऱ्या रोखण्याचे व चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
रांजणगाव MIDC पोलीसांनी शेतीपंप चोरी करणा-या तीन चोरांना अटक करत 10 गुन्हे आणले उघडकीस
कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…
ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार
केंदुरमध्ये विद्युत पंप चोरट्यांच्या हैदासाने शेतकरी हैराण…
शिरुर पोलिसांनी बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी केली गजाआड
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…