क्राईम

शिरूर तालुक्यात पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरटयांनी लांबविले अन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (दि. २५) एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे व पत्र्याच्या शेडचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले. चोरट्याने अंदाजे 2,52,545 रुपये किंमतीचा माल चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फिर्याद अजित बाळू येवले (वय 25), व्यवसायाने स्ट्रक्चर इंजिनिअर, रा. रेनवडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांनी दिली आहे. ही घटना कवठे येमाई गावाजवळील घोड नदीकाठावर घडली. चोरीस गेलेले साहित्य रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्वाचे होते.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago