क्राईम

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी फिरोज हा मला दारु पाज, असे म्हणाला तेव्हा संगमनाथ हा मी नाही पाहू शकत असे म्हणाला. त्यामुळे फिरोज याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत शेजारी पडलेल्या बांबूने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी संगमनाथचा भाऊ सचिन हा मध्ये आला असता त्याला देखील त्याने दगडाने मारहाण करत दोघांना जखमी केले.

याबाबत संगमनाथ नागनाथ कनजे (वय ३८) रा. सावतामाळी नगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी रा. भाजीबाजार शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रताप टेंगले हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

9 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

9 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

10 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

15 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

15 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

15 तास ago