मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ ही केवळ कौटुंबिक वाद, कट-कारस्थाने आणि भावनिक प्रसंगांसाठीच नाही, तर थरारक अॅक्शन सीक्वेन्ससाठीही ओळखली जाते. मालिकेत तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग असल्याने त्यांना विविध गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मालिकेत वेळोवेळी थरारक मारामारीचे प्रसंग पाहायला मिळतात आणि अशा भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.
आता पुन्हा एकदा मालिकेत जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी कौशिकीची प्रकृती ठीक नसल्याने केदारने एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये तिच्या ऐवजी राजकारणी बापुराव जामखंडे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान केदारने जामखंडेंना कठोर आणि थेट प्रश्न विचारत त्यांचे ‘पितळ’ उघडे पाडले. यामुळे बापुराव जामखंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये बापुराव जामखंडे यांचे समर्थक खांडेकरांच्या घराबाहेर जमल्याचे दिसते. “बापुराव जामखंडे जिंदाबाद” अशा घोषणा देत ते केदारचा निषेध करत आहेत. “आमच्या बापुसाहेबांचा अपमान झाला आहे,” असे म्हणत ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतात.
तारिणीचा रणरागिणी अवतार
याच वेळी तारिणी पुढे येत कार्यकर्त्यांना सुनावते, “केदारने काय चुकीचं केलं आहे? त्याने तुमच्या साहेबांचं सत्य जगासमोर आणलं आहे.” तिच्या या भूमिकेमुळे संतप्त कार्यकर्ते घरात शिरण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती गंभीर होताच तारिणी घरातील इतर महिलांना सुरक्षित खोलीत लपवते आणि स्वतः दरवाजा उघडून गुंडांचा सामना करण्यासाठी सज्ज होते.
यानंतर तारिणी आणि गुंडांमध्ये जोरदार मारामारी होत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. केदारसाठी तारिणी प्रत्येक संकटाला भिडणार, अशी कॅप्शन देत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. या दमदार सीनमुळे सोशल मीडियावर मालिकेचं जोरदार कौतुक होत आहे.
मालिकेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे केदार आणि तारिणी हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहेत, हे कुणालाही माहित नाही. त्यांची खरी ओळख गुप्त ठेवली गेली आहे. त्यामुळे ते एकाच वेळी दोन वेगवेगळे आयुष्य जगताना दिसतात. सध्या केदार एमएनएन न्यूज चॅनेलमध्ये काम करताना दिसत आहे. पुढे या कथानकात कोणते नवे ट्विस्ट येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…